2019-20 शेतकरी क्रुषी कवी संमेलन
शेतकरी क्रुषी कवी संमेलन लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलनाचे आयोजन प्रवरानगर दि.३ जुलै, २०१९ : सर्वच बाबतीत अनुकुलता असलेल्या भारत देशाकडे सर्वजगातील लोक आकर्षित होतात. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने भारताला शेतीप्रधान देश म्हटलं जाते, परंतु राजकारण,समाजकारण आणि अध्यात्मामध्येही शेती बद्द्ल प्रेम व्यक्त केलं जात असले तरी, नवीन पिढीचे शेती बाबतचे आकर्षण कमी होत असल्याची खंत प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केली. लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटपन प्रसंगी डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. कार्यक्रमासाठी कृषी विद्यापीठाच्या रा. से. यो चे कार्यक्रम अधिकारी आणि कवी महाविरसिंग चव्हाण प्रवरा परिसरातील शब्द्धश्नेही शब्दस्नेही चे अध्यक्ष्य कवी भास्कर दादा लगड, ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार प्राप्त...